“मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना सांगतो, आम्ही तुमचे आहोत. हे सरकार तुमचं आहे

मुंबई : “मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना सांगतो, आम्ही तुमचे आहोत. हे सरकार तुमचं आहे. कोणत्याही समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत राहणार नाही, हे मुख्यमंत्री म्हणून माझं तुम्हाला वचन आहे. सगळ्या समाजाला मी न्याय देईन. न्याय देताना कुणाचं काहीही काढून घेणार नाही”, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले.

मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आज (25 ऑक्टोबर) शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं.

“एक गोष्ट नक्की चांगली आहे, प्रत्येक समाज म्हणतोय, त्यांना आरक्षण द्या, हरकत नाही. पण आमचं तसंच राहू द्या. कुणाचंही आरक्षण कमी होणार नाही. आदिवासी, धनगर आणि ओबीसी आरक्षण आहे तसंच राहील. मराठा समाजाला आरक्षण देऊ”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“फक्त एकच हात जोडून नम्र विनंती करतोय जातपात आणि समाजात जे कुणी महाराष्ट्रात द्वेशच्या भींती उभ्या करत असतील त्यांच्या कारस्थानांना बळी पडू नका. कारण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात. तुम्ही म्हणजे शिवरायांचे मर्द मावळे आहात. तुमच्यात फूट पडली, तोडफोड करणाऱ्यात जर ते यशस्वी झाले तर केवळ आपलेच नाही तर महाराष्ट्राचे तुकडे करायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. म्हणून दसऱ्यानिमित्त महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल, असं मी काही करणार नाही, अशी शपथ घेऊया”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी

ग्लोबल न्युज नेटवर्क: