मनसेलाच खोक्यांची सवय आहे; ठाकरे गटाचा जोरदार टोला

 

मुंबई | स्वातंत्र्याची ७५ वर्षे… एका वर्षांत ७५ हजार रोजगार देण्यात महाराष्ट्राचा महासंकल्प, अशी जाहिरात आजच्या सामनाच्या पहिल्या पानावर छापून आली आहे. या जाहिराती वरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे, खोके सामनाच्या ऑफिसपर्यंत पोहचले का? असे म्हणत देशपांडे यांनी उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला.

आता देशपांडे यांनी केलेल्या याच टीकेवरून आता ठाकरे गटाकडूनसुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना मनसेच्या आंदोलनाचा दाखला देत प्रश्न विचारण्यात आला आहे. मनसेने टोलविरोधात आंदोलन केले. राज ठाकरे भोंग्यांवर बोलले; परंतु आता ते अगदी शांत आहेत. याचा ‘राज’ काय? मनसेकडेही खोके पोहचले का? असे म्हणत अंबादास दानवे यांनी मनसेवर टीका केली.

सामनातील जाहीराती हा वेगळा मुद्दा आहे. कारण सामना हे महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाहीराती येणे स्वाभाविक आहे. आलेली जाहीरात त्यांनी छापली यात गैर काय? मनसेलाच खोक्यांची सवय आहे, असेदेखील ते यावेळी म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा दौरा कुठल्याही गर्दीसाठी नाही तर लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आहे. अतिवृष्टीची मदत लोकांना पोहचली आहे का? याचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे दौरा करीत आहेत, अशी माहितीही दानवे यांनी दिली.

Team Global News Marathi: