मलिक आपल्या राजाचे राज्य धुळीला मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय – प्रसाद लाड

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचयव्हर घणाघाती आरोप लगावत एकच खळबळ उडवून दिली होती. तसेच मलिक दररोज आरोप करण्यासाठी समीर वानखेडे यांच्यावर पत्रकार परिषद आणि ट्विट करून त्यांच्या अडचणी वाढवण्याचे काम करताना दिसून येत आहे आता मलिक यांच्या या टीकेवर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मलिक यांना टोला लगावला आहे.

‘मध्ययुगीन भारतात अनेक नवाब होऊन गेले तसेच त्यांना जनतेची काळजी आणि कळवळा होता, पण आताच्या नवाबाला फक्त जावयाची काळजी आहे’, असं म्हणत प्रसाद लाड यांनी नवाब मलिकांवर टीकास्त्र सोडलं. त्याचबरोबर नवाब मलिक हे आपल्या राजाचं राज्य धुळीला मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचाही टोला आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, इतिहासातील मलिक अंबर यांचा संदर्भ देत मलिक अंबर यांना जनतेची काळजी, कळवळा, कणव होती. पण आताच्या मलिकांना कुणाचीही अजिबात पर्वा नाही, सर्व काही बाजूला ठेवून फक्त जावयाला वाचवणे आणि अधिकाऱ्यावर खोटे आरोप करणे हा एककलमी कार्यक्रम राबवला जात असल्याचा टोलाही प्रसाद ला़ड यांनी नवाब मलिकांना उद्देशुन लगावला आहे.

Team Global News Marathi: