महाविकास आघाडी सरकारचेशेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले पॅकेज खोटे

 

राज्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्या नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. त्यानुसार मदतही दिली. या मदतीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. तसेच हे पॅकेज खोटे असल्याचे सुद्धा बोलून दाखिवले आहे

भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांनी राज्य सरकारकडे मदतीची विनंती केली आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र, या राज्य सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे आहे.

राज्य सरजकारकडून शेतकऱ्यांची मदतीबाबत पूर्णतः फसवणूक करण्यात आलेली आहे. नुसती आश्वासने देण्याचे काम राज्य सरकारने केले असल्याने यंदाची दिवाळी हि शेतकऱयांसाठी काळी ठरणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या टीकेला आता महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे

Team Global News Marathi: