महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता

 

आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून प्रतिसाद नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच, पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणाही साधला आहे. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट आरोप केला आहे.

आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार आहोत, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आला नाही. तर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. नेहरूंनी कबुतरं सोडली होती, मात्र ती वाढदिवशी सोडली नव्हती. मात्र मोदींनी वाढदिवशी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे, असं सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीच्या यात्रेवर देखील टीका केली आहे. भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे.

Team Global News Marathi: