महाविकास आघाडी सरकामध्ये काँग्रेस नाराज, थोरातांनी दिले नवे संकेत

 

मुंबई | राज्यसभा निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजी सारखं काही नाही. इम्रान प्रतापगढी महत्वाचा युवक कार्यकर्ता असून त्याने पक्षा करता खूप काम केलंय. मुकुल वासनिक यांना राजस्थान मधून प्रतिनिधीत्व मिळालं आहे. आपण उत्तर प्रदेशला आणि राजस्थान आपल्याला मत देणार असल्याची स्पष्टोक्ती महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसंच, महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही, फक्त काही अडचणींवर दिल्लीत चर्चा होणार आहे, असंही थोरातांनी स्पष्ट केलं. शिर्डीमध्ये काँग्रेसकडून दोन दिवसांचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षात असलेल्या नाराजीवर थोरात यांनी स्पष्टीकरण दिलं. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. यावर बोलताना आशिष देशमुख युवक नेता आहे. वयामुळे थोडासा लवकर गरम होतो. संघटनेत सर्व व्यक्तीमत्व महत्वाचे आहेत. त्यांच्या कुटुंबाचं काँग्रेससाठी महत्वाचं योगदान आहे. आम्हाला त्यांचा सहभाग काँग्रेसमध्ये हवाय. नाराजीबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

‘आमचे प्रमुख नेतृत्व दिल्लीत आहे. अनेकदा दिल्लीत बैठका होत असतात. आमचं तीन पक्षांचे सरकार आहे. काही प्रश्न तर आहेच, अडचणी आहेत मी ते नाकारत नाही. पण एका पक्षाचे सरकार असलं तरी अंतर्गत प्रश्न असतातच. तीन पक्षांतील आमच्या सरकारमधील अडचणींची चर्चा दिल्लीत होणार आहे. मात्र केवळ त्याकरता बैठक आहे असं नाही, असंही थोरांतांनी महाविकास आघाडीत असलेल्या नाराजी बाबत बोलताना स्पष्ट केलं आहे.

पुणतांबा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून आंदोलन ‌सुरू होतंय. सात दिवस सरकारला वेळ देवूनही मागण्यांबाबत सरकारने पाऊले उचलली नाहीत त्यामुळे शेतकरी धरणे आंदोलन करतायत यावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सारवासारव केली. ‘मला शेतकऱ्यांना भेटण्यात काही अडचण नाही.शेतकऱ्यांना भेटून प्रश्न समजून घेऊन मार्ग काढला पाहिजे. शेतकऱ्याच्या मागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे याबाबत माझ्या मनात शंका नसल्याचे थोरात म्हणाले.

Team Global News Marathi: