महाराष्ट्रात रहायचं तर थोर महापुरुषांची नावे घ्यावीच लागतील, अन्यथा राज्याबाहेर हाकला – संभाजीराजे

 

महाराष्ट्रामध्ये रहायचे आणि गोडवे मात्र औरंगजेबचे गायचे..हे राज्यातील जनता कदापीही सहन करु शकणार नाही. त्यामुळे अबू आझमी यांना जर महाराष्ट्रात रहायचे असेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच, शाहू, फुले आंबेडकरांच नाव घ्यायला पाहिजे अन्यथा त्यांना राज्याबाहेर फेकायला पाहिजे अशी भूमिका छत्रपती संभाजी राजे यांनी मांडली आहे.

तसेच महाराष्ट्राला मोठा इतिहास आहे. राज्यात सर्व जाती-पंताचे नागरिक वास्तव्यास असले तरी औरंगजेबचे गुणगान कोणी करीत नाही. यांच्यामध्येच हे धाडस कसे निर्माण होते. यासाठी कोणी एकाने आवाज उठवून प्रश्न मिटणार नाहीतर नागरिकांनीच त्यांना हाकलून दिलं पाहिजे असे मत संभाजी राजे यांनी व्यक्त करत अबू आझमीवर निशाणा साधला आहे.

तसेच एका सात वर्षाय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे अशा नराधमाला कठोरात कठोर शासन व्हावे अशी अपेक्षा राज्यातील जनत करीत आहे. महाराष्ट्राचे हे संस्कार नसले तरी दिवसेंदिवस अशा घटना ह्या वाढत आहे. कायदा कडक करण्यासाठी पार्लमेंटमध्ये खासदारांनी आवाज उठवायला हवा, जेणेकरून अस धाडस कोणी करणार नाही, कायद्याचा धाक राहिला नसल्यानेच अशा घटना वाढत असल्याचे राजे यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: