महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय’ जयंत पाटलांचा पंतप्रधान मोदींना टोला |

 

मुंबई | उत्तरप्रदेश सरकारने कोरोना काळात केलेल्या कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी सरकारचे तोंडभरून कौतुक केले होते. आता याच कौतुकीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये योगी सरकारने अभूतपूर्व काम केलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने चांगलं काम केलं आहे अशी स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मात्र ‘उत्तरप्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली.

अशा परिस्थितीत उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगली हाताळली असं म्हटलं जात असेल तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार मी करतोय !’ असं म्हणत जयंत पाटील यांनी मोदींना टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी बीएचयू मैदानावर एक बटण दाबून १५८३ कोटींच्या २८० योजनांचे उद्घाटन करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला. त्यावेळी बोलताना मोदींनी उत्तर प्रदेश हा संपूर्ण देशात सर्वाधिक कोरोना चाचणी करणारे राज्य आहे अशी स्तुती केली होती.

Team Global News Marathi: