साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन

साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन

ग्लोबल न्यूज: कथाकथनकार आणि विनोदी लेखक दमा (दत्ताराम मारुती मिरासदार) यांचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

त्यांचा जन्म १४ एप्रिल, १९२७ मध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले होते. पुण्यात आल्यावर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी १९५२ साली अध्यापन सुरू केले. पुण्यात कॅंप एज्युकेशनच्या शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.

मराठीतील पूर्वासूरींनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारांनी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या माझ्या बापाची पेंड, , भुताचा जन्म, व्यंकूची शिकवणी, शिवाजीचे हस्ताक्षरमाझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा लिखाण आणि सादरीकरणामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.

 

गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या आहेत. १९९८ साली परळी येथे झालेल्या ७१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख मिरासदार यांनी लिहिले. त्यांना राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: