जाऊ तिथं खाऊ’…गीते, बागुल यांच्या टीकेला बाळा नांदगावकर यांचा टोला
माजी आमदार वसंत गिते व नाशिकमधील स्थानिक नेते सुनील बागुल यांनी शुक्रवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून या दोन्ही नेत्यांनी सेनेच्या तंबूत प्रवेश केला. मात्र यावेळी पत्रकार परिषदेत माजी आमदार वसंत गीते यांनी मनसे नेत्यांवर सुद्धा आरोप लागले होते. आता या आरोपांना मनसे नेते वाला नांदगावकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
खाऊ तिथे आम्ही जाऊ’ अशा शीर्षकाची पोस्ट फेसबुकवर लिहून बाळा नांदगावकर यांनी गिते व बागुल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये नांदगावकर म्हणतात की, “खाऊ तिथे आम्ही जाऊ” २ दिवसांपूर्वी नाशिक येथील काही “अतिशय मोठे” नेते बोलले कि नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडला. हे तेच “मोठे नेते” आहेत ज्यांनी मनसेची चलती असतांना सेना सोडली, भाजप ची सत्ता असतांना मनसे सोडली, सेने ची सत्ता असताना परत भाजप सोडली.
एवढ्या “निष्ठावंत” नेत्यांवर काय बोलणार. यांचे ‘जिथे भेळ तिथे खेळ’ अशा प्रकारचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो. शक्यतो वैयक्तिक शेरेबाजी करणे राजकीय जीवनात कायम च टाळत आलो, परंतु काही लोक आपली पायरी ओळखून राहत नाही म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रिया येते. त्यांना खुप शुभेच्छा व एकच मैत्रीपूर्ण सल्ला आता तरी गेल्या घरी सुखी राहा असा टोला नांदगावकर यांनी लगावला आहे.