मराठा आरक्षण संदर्भात आघाडी सरकार कमी पडले – देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षण संदर्भात महाविकास आघाडी सरकार कमी पडले असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ही स्थगिती तीन न्यायाधीशांच्या खंडपिठाने सुनावली आहे. आता पाच नायायाधीशांच्या खंडपीठाकडून स्थगिती उठवली जात नाही तोवर स्थगिती कायम राहणार आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही जाण्यापूर्वी नियोजित स्टॅटर्जी करून जायचो, कोर्टातील सुनावणीला सतर्क राहावे लागायचे. मराठा समाजाच्या सगळ्या संघटनांनी सांगितले की, राज्य सरकार कमी पडले. हा माझ्याकरता राजकारणाचा मुद्दा नाही. आपण यात मार्ग काढला पाहिजे, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण कसं मिळेल हे आता पाहायला पाहिजे.
यावेळी त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी लागवळलेय आरोपाला उत्तर दिले आहे. खडसेंना मनीषा भांगले प्रकरणी नाही तर एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्यावर माझ्यामुळे नाही तर न्यायालयाच्या आदेशाने झाला असे बोलून दाखविले.