संसदेत कोकणाची अब्रु घालविणाऱ्यांनी नारायण राणे कसे चुकले यावर बोलू नये,

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील संघर्ष अधिक उफाळून आला आहे. त्यातच राणे कुटुंबियांच्या टीकेला शिवसेना सुद्धा सडेतोड प्रतिउत्तर देताना दिसून आले आहे. त्यातच राणे यांच्या नवी दिल्ली येथील भाषणाची शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी खिल्ली उडवत टीका केली होती. आता या टीकेचा निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे.

संसदेत कोकणाची अब्रू घालवणाऱ्यांनी नारायण राणे कसे चुकले होते त्यावर बोलू नये असं निलेश राणेंनी विनायक राऊत यांना सुनावले आहे. लोकसभेत एका प्रश्नला उत्तर देताना नारायण राणे अडखळल्याचा व्हीडिओ शिवसेनेने व्हायरल केला आहे. तसंच खासदार विनायक राऊत यांनी या भाषणाची खिल्ली उडवली आहे. त्यावरून आता भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे आक्रमक झाले आहेत.अर्ध मराठी, अर्ध हिंदीतू बोलून महाराष्ट्राची आणि कोकणाची अब्रू तुम्ही दिल्लीत घालवली.

तुम्हाला कधी बाळासाहेब ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं आहे? तुम्ही नारायण राणेंवर बोलत आहात. पण लक्षात ठेवा ते मुख्यमंत्री होते, आता केंद्रात मंत्री आहेत. जे संसदेत धड बोलू शकत नाहीत ते नारायण राणेंवर कसे काय बोलतात? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

Team Global News Marathi: