कोणाच्या आजारावर काही बोलायचे नाही, मात्र.. नाव न घेता राज ठाकरेंचा मुख्यत्र्यांना टोला

 

मनसेचा १६ वा वर्घापनदिन बुधवारी सायंकाळी ठाकरे यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रिडा मंदिरात झाला. वर्धापनदिनाचा कार्यक्रम पुण्यात प्रथमच होत असल्याने ठाकरे राज्यात सध्या सुरू असलेल्या इडीच्या धाडी व अन्य राजकीय हालचालींवर काहीही न बोलता मुख्यमंत्र्यांच्या आजारावर नाव न घेता भाष्य केले.

कोणाच्या आजारावर काही बोलायचे नाही, मात्र निवडणूका लांबणीवर जाण्याचे खरे कारण ते आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रत्यक्ष नाव न घेता ते म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टारगेट केले गेले. त्यांना तुम्हाला जातीपातीतच गुंतवत ठेवायचे आहे. इतिहास काय लिहिला ते पहात नाहीत. कोणी लिहीला आहे ते पाहतात.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हा माझा शिष्य असे रामदासांनी म्हटले नाही व हे माझे गुरू असे छत्रपती शिवाजी महाराजांनीही म्हटले नाही. मग समजत नाही त्यावर राज्यपाल बोलतात कशाला असा प्रश्न करत ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची नक्कलही केली. रामदासांनी महाराजांना श्रीमंत योगी म्हटले आहे. आता इडीची धाड पडली की योगी कोण ते समजते असे ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: