“कोल्हापूरकरांचे जोरदार प्रत्युत्तर,भाजपला केले निरुत्तर”- अशोक चव्हाण

 

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडण्याचे भाजपचे स्वप्न आता संपले आहे.कारण या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.

या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. तसेच कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.या निकालानंतर आता काँग्रेसचे नेते आणि शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी भाजपावर आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टोला लगावला आहे. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

‘कोल्हापूरकरांचे जोरदार प्रत्युत्तर, भाजपला केले निरुत्तर… शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार हेच खरे उत्तर…
#उत्तरकोल्हापूर च्या नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई चंद्रकांत जाधव तसेच सतेज डी. पाटील, हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर व संपूर्ण #महाविकासआघाडी चे मनःपूर्वक अभिनंदन…’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: