केदार दिघे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेवर साधला निशाना

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वादामुळे शिवसेनेत फूट पडल्याचं दिसून येत असून आत दोन गट निर्माण झाले आहेत. त्यातच हा वाद सुप्रीम कोर्टापासून केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. त्यात खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, यातच आता एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे. आता, या मागणीवर शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना नेते केदार दिघे यांनीही या मागणीवरुन शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.

शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्यामुळे आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात संघर्ष वाढला आहे. आतापर्यंत शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचाच असा दावा शिंदे गटाकडून वारंवार करण्यात येत होता. परंतु पहिल्यांदाच घटनापीठाकडे सुनावणी घेताना शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवा अशी मागणी केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घ्या अशी मागणीही शिंदे गटाचे वकील कौल यांनी केली. त्यानंतर, शिवसेना नेत्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे धनुष्यबाण चिन्ह गोठवा म्हणतात, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केला. शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे, आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे, बाळासाहेबांचीच निशाणी गोठवायला निघाले आहेत, अशा शब्दात केदार दिघे यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे. तर, खासदार अरविंद सावंत, आमदार मनिषा कायंदे, आमदार वैभव नाईक यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

Team Global News Marathi: