मुंबई: ‘सोनियासेना किती तोंडं बंद करणार?’, अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर कंगनाचा प्रश्न
रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अर्णबच्या अटकेनंतर अभिनेत्री कंगना राणवतने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात कंगनाने तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? असा सवाल केला आहे.
तुम्ही अर्णब गोस्वामी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात?, असा सवाल तिनं केलाय. “सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील, असं कंगनानं म्हटलं आहे.