जिथे-जिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यालय, तिथे-तिथे ताबा मिळवणार ;

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत दुफळी निर्माण केली. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत. आता मुंबई महापालिकेत असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालयावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात खडाजंगी पाहायला मिळत आहे. यावर त्यानंतर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.महाराष्ट्रात जिथे आवश्यकता आहे. तिथे-तिथे शिवसेना कार्यालयावर जाऊन करेक्ट कार्यक्रम करणार आणि आम्ही ताबा मिळणार, असे गोगावले म्हणाले आहेत.

आमच्याकडे संख्याबळ आहे. त्यामुळे ठाक रेगटातील नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवं. अन्यथा आम्ही त्यांना आमच्या शैलीत समजावू, असा इशाराही गोगावले यांनी दिला. इतकेच नाही तर स्फोट करण्यासाठी शिवसेनेकडे दारुगोळा शिल्लक नाही. संजय राऊत बोलून दमले आहेत. उदय सावंतांनी सांगितलं की, आम्ही बॉम्बशोधक पथक आणलंय त्यामुळे हा स्फोट होऊ शकला नाही. मुंबईहून येऊन जर ते काय बोलू शकत नसतील तर त्यांच्या स्फोटातला दारूगोळा संपला आहे, हे स्पष्ट झाल्याचा टोला गोगावले यांनी लगावला आहे.

माझ्याकडे स्फोट करण्यासारखी अनेक प्रकरणं आहेत. सभागृहामध्ये आता सगळे विषय मांडणार आहे. पार्ल्यापासून ब्रांद्र्यापर्यंत कसे हादरे देतो ते तुम्ही बघाच, असेही ते म्हणाले. कर्नाटक सीमाप्रश्न आणि मुंबईबाबतही भरत गोगावले बोलले.मुंबई कुणाच्या बापाची नाही, असेही गोगावले म्हणाले. कर्नाटकने आगाऊपणा करू नये. सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे. त्यातून जे समोर येईल त्यानंतर आम्ही आमची पावलं पुढे टाकू. मुंबई तर लांब राहिली पण त्यांनी कोल्हापूरचेही नाव घेऊ नये, असे गोगवले म्हणाले.

Team Global News Marathi: