कायदा समजत नाही असा अडाणी केंद्रीय मंत्री झाला हे आमचं दुर्दैव ! वाचा कोणी केली टीका

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक शीतयुद्ध सुरु झाले होते. चिपी विमानतळाच्या उदघाटन प्रसंगाच्या मुद्द्यावरून मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एका शिवसेना पक्षाला डिवचले होते. आता राणेंनी चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी टोला लगावला आहे.

 

राणे यांच्या दोन्ही मुलांचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, “बहुचर्चित चिपी विमानतळाची प्रतीक्षा सर्वांनाच होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी चार बैठका घेतल्या. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी अकरा वाजता फोनवर चर्चा केली. ९ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उदघाटन होणार आहे. साडेबारा वाजता मुंबईतून कोकणासाठी विमान उडेल. यासाठी संबंधित सर्व लोकांना मी २ सप्टेंबरलाच भेटलो. विमानतळ हे महाराष्ट्र एमआयडीसीचं आहे, केंद्र सरकार लायन्स देण्याचं काम करतंय. तुम्ही कोण सांगणारे? टिंगू-मिंगू कालपासून लागलेत बढाया मारायला.” असं टोला निलेश आणि निलेश राणे यांनी लगावला होता.

पुढे राणेंचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, नारायण राणे यांना ह्या विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही. त्यांनी फुशारकी मारताना थोडे तरी भान ठेवावं. उद्घाटन करायला २२ वर्षे झाली. इतकी वर्षे राणे होते कोठे? आतापर्यंत फक्त १४% काम झाले होते. दिपक केसरकर पालकमंत्री असताना त्यांनी निधी दिला. मी स्वत: यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. बाप-बाप म्हणून मिरवणारा नितेश राणे यांना ह्या विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही. ज्याला कायदा समजत नाही असा अडाणी मंत्री झाला हे आमचे दुर्दैव.”

Team Global News Marathi: