नेत्यांची सुरक्षा महत्वाची की सामान्य नागरिकांची ?
आज राज्य सरकारने अनेक बड्या नेत्यांची सुरक्षा काही कारणास्तव काढून घेतली. हाच मुद्धा पकडून विरोधकांनी सत्तेत बसलेल्या पक्षांना टार्गेट करत जोरदार टीका केली होती. या सर्व घडामोडीत विरोधकांनी आणि सत्तेत बसलेल्या नेत्यांनी एकमेकांवर जणू शब्दांची चिकलफेक केली होती.
या सर्व घडलेल्या घडामोडीत भंडारा येथे २४ तासापूर्वी घडलेली घटना जणू नेते मंडळीं विसरून गेले होते. तसेच दिवसभर प्रसार मद्यमांनी सुद्धा याचं बातम्या दाखवून पुरेपूर जनतेचे करमणूक करण्याचे काम केले होते. पण आज खऱ्या सुरक्षेची गरज नेत्यांना आहे की सामान्य जनतेला असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो, कारण सामान्य जनताच यांना निवडून देऊन सुरक्षा घेण्याच्या लायक बनवते म्हणूनच जनतेची सुरक्षा प्रथम येते हे आजचे नेते मंडळी विसरत आहे.
आता मुद्दा राहिला नेत्यांच्या सुरक्षेचा तर आज चार-चार पोलीस, बंधूकधारी कमांडो घेऊन फिरणे आजच्या आजी-माजी नेत्यांसाठी फॅशन झाली आहे. जितके पोलीस जास्त तितका रुबाब अधिक, हे कितपत योग्य आहे. अरे गल्लीत फिरणारा नगरसेवक सुद्धा पोलीस संरक्षणासाठी अर्ज करतो ही आजची आपल्या देशाची परिस्थिती आहे.