भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणूका होतील अशी परिस्थिती असल्याचे म्हणाले होते. यावर आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले आहेत की, राजभवनात जाऊन हे सांगावं लागेल असा टोला राऊत यांनी पाटलांना लगावला होता.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दलही खुलासा केला. ते माध्यमांशी बोलत होते. राऊत फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर. चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते असे बोलून दाखविले.
सरकार बनवण्याची घाई भाजपला नाही; ते आपल्या कृतीमुळे कोसळेल- देवेंद्र फडणवीस
दरम्यान मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य केले होते. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे पाटील यांनी बोलून दाखविले होते.
राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता ? की नवे सरकार बनणार..!