नवाब मलिकांची हायकोर्टात हमी, वानखेडे कुटुंबियांना दिलासा

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांची समीर वानखेडे आणि त्यांच्या परिवारावर सुरु असलेली आरोपांच्या फेऱ्या आता काही काळापुरती स्थगित होणार आहे. हायकोर्टातील पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही, अशी हमी नवाब मलिकांनी हायकोर्टात दिली आहे. यामुळं अखेर वानखेडे कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

एकलपीठाच्या निर्णयाला वानखेडेंकडून खंडपीठापुढे आव्हान देण्यात आले होते. आता या प्रकरणी ९ डिसेंबरला हायकोर्टात पुढील सुनावणी आहे. मलिक यांनी याबाबत कुठेही तक्रार का केली नाही?, केवळ ट्विट करून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात? का हे सारं निव्वळ प्रसिद्धीपोटी? की मीडिया ट्रायलसाठी? अशा सवालांची सरबत्ती न्यायमूर्ती एस. काथावालांकडून मलिकांच्या वकिलांवर यावेळी करण्यात आली.

समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिकांनी ट्वीटरवर केला होता. नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे आणि ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. समीर वानखेडेचे गैरप्रकार मी गेले ५५ दिवस उघड करत आहे. वानखेडे कुटुंबीयाची ओळखच दुहेरी असल्याचे मलिक यांनी म्हटले. वानखेडे कुटुंबीय वैयक्तिक जीवनात मुस्लिम राहिले. मात्र, अनुसूचित जातीचे फायदे मिळवण्यासाठी प्रमाणपत्रांवर हिंदू राहिले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

Team Global News Marathi: