नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 85 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर आतापर्यंत सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 79 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 45 हजार 903 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 490 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 85 लाख 53 हजार 657 एवढा झाला आहे.
सध्या देशातील विविध भागात 5 लाख 09 हजार 673 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 26 हजार 611 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 79 लाख 17 हजार 373 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.