‘भानगडी करणारेच सरकारमध्ये होते तर कशाला ईडी कारवाई करेल? भाजपचं पवारांना उत्तर

 

खासदार भावना गवळी यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईवर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्षशरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला टोला लगावला होता. राज्यातील नेत्यांना नाहक त्रास देण्यासाठीच ईडीच्या कारवाया सुरू असून याआधी एकाचवेळी ईडीच्या इतक्या कारवाया कधी पाहिल्या होत्या का?, असा सवाल पवारांनी उपस्थित केला होता.

त्यावर आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात एकाचवेळी ईडीच्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? असं म्हणतात. पण पूर्वीच्या काळी भानगडी करणारेच सरकारमध्ये असतील तर कशाला ईडी कारवाई करेल?”, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. या संर्भात त्यांनी ट्विट करून केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात एकाचवेळी ‘ईडी’च्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? पूर्वीच्याकाळी भानगडी करणारेच सरकारमध्ये असतील तरकशाला ईडी कारवाई करेल? बिनदिक्कत सुरू होत कारण सैयां भये कोतवाल, अब डर काहे का? आतापरिस्थिती बदलली त्यामुळे कारवाया होत आहेत असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

Team Global News Marathi: