राज्यघटनेतील अकबर आणि टिपू सुलतान यांची चित्रे हटवा – करणी सेना

 

हिंदूंवर अत्याचार करणारा टिपू सुलतान आणि अकबर यांची चित्रे ‘देश की महान विरासत’ असे नमूद करत राज्यघटनेत देण्यात आली आहेत. ही चित्रे राज्यघटनेतून काढून टाकण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

शनिवारी अजयसिंह सेंगर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन याविषयी मागणी केली आहे या वेळी संत रोहिदास सेनेचे अध्यक्ष किरण सोनवणे आणि शेरा राजपुरोहित हेही उपस्थित होते. त्यामुळे नव्या वाढला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निवेदनामध्ये अजयसिंह सेंगर यांनी म्हटले आहे की, हिंदूंवर अत्याचार करणारा, सहस्रावधी हिंदूंची हत्या करणारा आणि हिंदूंची मंदिरे तोडणारा अकबर अन् टिपू सुलतान हे ‘महापुरुष’ कसे ? केवळ मुसलमानांच्या मतांसाठी काँग्रेसने राज्यघटनेत ही चित्रे छापली आहेत. हिंदूंना डिवचण्याकरता अकबर आणि टिपू सुलतान यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

Team Global News Marathi: