ताई राजकारण करायचं असेल तर आपल्या गावी निघून जा – सुबोध भावे
पाकव्यप्त काश्मीरची सिनेअभिनेत्री कंगना रानौत हिने ट्विटर वरून पाकव्याप्त काश्मीरशी मुंबईची तुलना केली होती. त्यामुळे कंगना राणावतवर सर्वच माध्यमातून टीका केली जात आहे. त्यातच अभिनेता सुबोध भावे यानेही, कंगनाला सुनावताना “ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा”, असे म्हटले आहे. तसेच रेणुकास शहाणे, केदार शिंदे अशा अनेक मराठी कलाकारांनी ट्विट करून कंगनाला झापले आहे.
कंगना राणावत अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सातत्याने भाष्य करत असून तिने काही दिवसांपूर्वी मला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते, असे म्हणत मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यानंतर काल तिने थेट पाकव्याप्त काश्मीरशी मुंबईची तुलना केली.
मला शिवसेना नेते संजय राऊत यांनी धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये, असे म्हटल्याचे तिने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते. त्याचबरोबर यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर ‘स्वातंत्र्या’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटते?, असे ट्विट करत कंगना म्हणाली.