जातीच्या विषयावर राजकारण करायचे असेल तर राजीनामे देऊन घरी बसा – उदयनराजे भोसले
ग्लोबल न्यूज: राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापलेलं दिसून येत आहे. त्यात मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. यानंतर, स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने याचिका दाखल केल्या होत्या. मात्र मराठा समजला आरक्षण मिळावे यासाठी मराठा राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांसह भाजप नेत्यांनी केला होता
त्यात आज भाजपा नेते आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणप्रश्नी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
जनतेशी संबंधित मुद्द्यांवर राजकारण करा. जातीच्या विषयावर राजकारण करायचे असेल तर राजीनामे देऊन घरी बसा. मराठ्यांना आरक्षण द्यायचे नसेल तर तसे सांगा, लोक तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही असा टोला खा. उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारला लगावला होता.