चाणक्य नितीनुसार हे पाच गुण असतील तर तुम्ही कधीच अपयशी होणार नाही
यश अपयश ह्या दोन गोष्टी मानवाच्या आयुष्यात खूपच महत्वपूर्ण आहेत. जर आपण आपल्या व्यवसायात किंवा शिक्षणात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालो तरच आपली एक वेगळी ओळख निर्माण होते. ही वेगळी ओळख निर्माण होण्यासाठीच आपण चाणक्य नितीमधून काही शिकायला हवे. चाणक्य नीती म्हणजे नेमके काय ते आपण जाणून घेणार आहोत. तर चला मग जाणून घ्या चाणक्य नीती म्हणजे काय ? कोण होता चाणक्य ? आणि इतके वर्ष झाले तरी चाणक्य नीती का उपयोगी आहे.
आर्य उर्फ चाणक्य हा चंद्रगुफ्त मौर्याच्या मंत्री मंडळातील एक हुशार आणि चाणाक्ष महामंत्री होता. चाणक्य यांच्या अनेक कहाणी प्रसिद्ध आहेत. त्याने जीवन जगण्याचे अतिशय उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत. या सर्व ज्ञानाला चाणक्य नीती म्हणतात .
ज्ञान – ज्ञान ही यशाची सर्वात महत्वाची पायरी आहे. जर तुम्हाला ज्ञान असेल तर जगात ,तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. ज्ञानी माणूस स्वतच्या ज्ञानावर स्वताला सिद्ध करतो. ज्ञान हे मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. ज्ञान ही एक साधना आहे. ती सतत केल्यामुळेच साध्य होते. चाणक्य देखील ज्ञानाचे महत्व सांगून गेला आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती असेल म्हणजेच ज्ञान असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे वाचन करणे , दुसरी पायरी म्हणजे अनुभव घेणे.
चौकस दृष्टी व सजगता – कोणतीही गोष्ट करताना नेहमी आजूबाजूला लक्ष असावे. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे ,हे आपल्या नेहमी माहीत असावे. कोण काय करत आहे, कोणते काम कशा प्रकारे चालते, तुमच्या आजूबाजूला काय घडत आहे हे तुम्हाला सतत माहीत असायला हवे.
बचत करण्याची सवय व संचित धन – संचित धन ही देखील फार महत्वपूर्ण गोष्ट आहे , जर तुमच्याकडे संचित किंवा बचत केलेले धन असेल तर ते तुम्हाला कधीही कामाला येऊ शकते. बचत करण्याची सवय कधीही उत्तम असते. याचे तुम्हाला अडी -अडचणीच्या वेळेस खूप मदत होते. त्यामुळे शक्यतो पैसे खर्च करू नयेत. त्याची योग्य ती बचत करावी. बचत नेहमी माणसाला एक पाऊल पुढे ठेवते.
वाचा :आपल्याला तणावमुक्त जीवन जगण्याची इच्छा असेल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवा.
आत्मविश्वास – आत्मविश्वास हा शब्द जरी खूप महत्वाचा आहे. कोणतीही गोष्ट करताना ती गोष्ट तुम्ही स्वता आत्मविश्वासाने करावी म्हणजे ती योग्य रित्या होते. काही गोष्टी अगदी सहज सोप्या रीतीने कराव्यात पण त्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास असावा. मी ही गोष्ट करू शकतो आणि ती मला जमणार आहेच हा आत्मविश्वास असावा. तुम्ही आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करू शकता.
वाचा: कंगनाचा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना माहित आहे ;खा.अमोल कोल्हे
सातत्य – तुम्ही कोणतीही गोष्ट करत असाल तर त्या गोष्टीमध्ये तुमचे सातत्य असावे कारण कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवणे अतिशय महत्वपूर्ण आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट करत राहिला तर तुम्ही त्या मध्ये यशस्वी होता. तुम्हाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामिळते.