ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन बोलले तर मी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख पद सोडायला तयार : उध्दव ठाकरे –

ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन बोलले तर मी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख पद सोडायला तयार : उध्दव ठाकरे –

मुंबई,दि.२२: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत. संवाद साधताना केवळ मुख्यमंत्रीपद नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार असे उध्दव ठाकरे म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर ठिक आहे. मला दु:ख झाले. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं….सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं…. तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको,असं तोंडावर सांगावं, असे उद्धव ठाकरे म्हणाले,

मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायाल तयार आहे. परंतु, ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. समोर येऊन बोललात तर संध्याकाळी देखील राजीनामा देतो, उद्वध ठाकरे यांनी म्हटले आहे.

https://fb.watch/dONRUS9UUT/

मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण समोर येऊन सांगा… मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

प्रशासनाचा अनुभव नसताना कोरोनासोबत लढलो. कोरोना काळात आपण चांगलं काम केलं, असे मुख्यंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: