मराठा आरक्षणात गडबड झाल्यास त्यास राज्य सरकार जबाबदार- छत्रपती संभाजी राजे
मराठा समाजासाठी शासनाने EWS चा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री मंडळात झालेल्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. यावर आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य केले आहे. जर आर्थिक मागास वर्गाच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल असे त्यांनी बोलून दाखविले आहे. ते पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने EWSचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या केंद्राच्या १० टक्के आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे.
यावर बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले की, खासदार संभाजीराजे म्हणाले, खुल्या प्रवर्गातून ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी हे EWS चे आरक्षण देण्यात आले आहे. राज्यात मराठा समाजाला SEBC प्रवर्ग तयार केल्याने त्यांना हे आरक्षण मिळत नव्हते. पण केंद्रीय आरक्षणानुसार आधीच मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळत होते. यामध्ये इतरही अनेक समाजांचा समावेश आहे. त्यामुळे हे केवळ मराठा समाजासाठीच दिलंय असं म्हणता येत नाही.
पुढे बोलताना राजे म्हणाले की, सरकारला मी पहिल्यापासून सांगतो आहे की आपण मराठा समजासाठी EWS चं आरक्षण दिलं तर त्यामुळे SEBC ला धोका निर्माण होऊ शकेल का? त्यापेक्षा सुपरन्युमररीचा पर्यायही मी सरकारला दिला होता. दरम्यान, सरकारच्या निर्णयानंतर यावर सकल मराठा समाज काय भूमिका घेईल ते त्यांनी मला सांगावं, त्यांच्या भूमिकेनुसार मी जाईल असे त्यांनी बोलून दाखवले.