संभाजीनगर नाव केले नाही तर महाराष्ट्रात आंदोलन केली जातील, मराठा समनव्यकांचा ईशारा
मुंबई- औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर होऊ न देण्यास काँग्रेसने विरोध केला,त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.याचधर्तीवर आज मराठा क्रांती मोर्चाच्या समनव्यकांकडून काँग्रेसचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती.यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत, शिवसेनेने जर औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले नाही. तर शिवेसनेने हिंदुत्व सोडावे.
शिवसेनेला हिंदुत्व सिद्ध करण्याची हीच वेळ आहे,असे मत मराठा समनव्यकांनी व्यक्त केले. संभाजीनगर नाव केले नाही तर महाराष्ट्रात आंदोलन केली जातील आणि ही आंदोलन आहेत ती गनिमी काव्याने केली जातील,असा ईशारा मराठा समनव्यकांनी यावेळी दिला.