आज महाराज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांच्या केला असता- निलेश राणे

आज महाराज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांच्या केला असता- निलेश राणे

राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे.

तसंच,’श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातीन खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली होती.

आता राऊत यांनी भाजपावर केलेली टीकेचा भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. या संदर्भात राणे ट्विट करून म्हणतात की, “लाज सोडली शिवसेनेनी… शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्य भर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा. असे त्यांनी म्हटले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: