अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर फडणवीसांचे सरकार टिकले असते – चंद्रकांत पाटील
ग्लोबल न्यूज: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षात इनकमिंगला सुरवात झालेली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठे विधान केले होते. जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तिन्ही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु असे बोलून दाखविले होते. आता अजित दादांच्या या आवाहनाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर ८० तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते. त्यांच्या आमदारांना त्यांनी सांभाळलं असतं तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपचे आमदार नाराज असून लवकरच राष्ट्रवादीमध्ये मेगाभरती होणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतात. मात्र तुम्ही सरकर चालवा आम्ही विरोधी पक्ष सांभाळू, असं पाटील यांनी म्हटले आहे. साईबाबाच्या दर्शनासाठी पाटील शिर्डीमध्ये आले होते त्यावेळी ते बोलत होते.