मी राष्ट्रवादीत होतो; रियाझ भाटीने केला खुलासा !

 

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच त्यांचं पाकिस्तान आणि दाउदशी कनेक्शन असल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी रियाज भाटी याचे आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर रियाज भाटी समोर आला असून आपण राष्ट्रवादीत होतो, असा दावा त्याने केला आहे.

मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे रियाझ भाटी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशीही रियाझचे सबंध असल्याचं समोर येत आहे. रियाझचा दाऊदच्या टोळीशी संबंध आहे. त्याच्यावर फसवणूक, खंडणी वसुली, जमीन बळकावणे आणि फायरिंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

तसेच २०१५ ते २०२० मध्ये बनावट पासपोर्ट बाळगल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यावेळी कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत देश सोडून पळून जाताना त्याला अटक करण्यात आली होती, असही मलिक यांनी म्हटलं होतं. दरम्यान रियाज भाटीने म्हटलं की, मी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मार्केटींग कमेटीमध्ये आहे. त्यामुळे आशिष शेलार यांची भेट झाली आहे. माझा बीजेपीशी काही संबंध नाही असे रियाज भाटी याने यावेळी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: