शेतकरी जागा आहे वाटतो: केंद्र शासनाच्या कृषी धोरणावर पत्राच्या माध्यमातून सदाभाऊ खोतांची टीका
माजी कृषी राज्यमंत्री , आमदार सदाभाऊ खोत यांची पत्राच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कृषी धोरणावर टीका केली आहे. कांदा आयातीचे धोरण , खाद्यतेलाच्या आयात शुल्कात नियोजित कपात आणि त्यामुळे तेलबिया बाजारावर होणारा परिणाम या अनुषंगाने त्यांनी सरकारला त्यांनी घरचा आहेर दिला आहे.या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील , अशी भीती व्यक्त करणारे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि सार्वजनिक वितरणमंत्री पियुष गोयल यांना दिले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संकट काळात आधार देण्याची गरज आहे . त्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, आयातीवर नियंत्रण ठेवावे आणि कांदा साठवणूकीबाबतचे निर्बंध कमी करावेत अशी केली मागणी केली आहे.साठवणुकीवर निर्बंध हे केंद्राने नुकत्याच मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधी निर्णय ठरेल , अशी भूमिका गोयल यांना पाठवलेल्या निवेदनात खोत यांनी मांडली आहे.