गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला, डॉ तात्याराव लहाने यांचा आरोप
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या सत्कारासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे नगर येथे आले होते. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान डॉ तात्याराव लहानेंनी फडणवीस सरकारवर मोठा आरोप लगावला आहे. गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला असे लहाने म्हणाले आहेत.
धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेले आहे. याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली. मी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार मानीन असेही डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.
पुढे बोलताना डॉ लहाने म्हणाले की, “राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कायम गोरगरीब लोकांची सेवा करण्यास प्राधान्य देतात. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो,” अशा शब्दात डॉ. तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.