कोरोना काळात आंदोलन करताना विरोधकांना लाजा कशा वाटत नाही- हसन मुश्रीफ
सध्या राज्यात कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना आघाडी सरकार दिसून येत असताना दुसरीकडे मात्र विरोधी पक्षाने अर्थात भारतीय जनता पक्षाने आपल्या खुरापती सुरूच ठेवल्या आहे. विरोधकांच्या या वर्तणुकीचा मात्र आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
काही दिवसापूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बदलाच्या राजकारणावरून आघाडी सरकारवर आरोप लगावले होते तसेच सीआयडी चौकशीची मागणी सुद्धा केली होती. आता या टीकेची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खिल्ली उडवली आहे.
कोरोना ही जागतिक महामारी पसरलेली असताना अशा महाभयानक संकटात हातात हात घालून एकजुटीने लढण्याची गरज आहे. परंतु विरोधक मात्र अशा कोरोना च्या संकट काळातही आंदोलने करीत आहेत. तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? असा सवालही मंत्री मुश्रीफ यांनी नाव न घेता चंद्रकात पाटलांना विचारला आहे.
अशी फसलेली आंदोलने कशाला करताय? किमान अभ्यास करून तरी आंदोलन करा. देवेंद्र फडणवीस यांना तर मी किती ओरडून सांगितलं तुमचं सगळं पंचांग बरोबर आहे पण हे मुहूर्त चुकतात कसे?, शासकीय अधिकार्यांच्या बदल्यांवरून चंद्रकांतदादा पाटील सीआयडी चौकशी लावा म्हणतात. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, २०१४ पासून सगळ्याच बदल्यांची चौकशी करूया. त्यालाही माझा पाठिंबा आहे,’ असंही ते म्हणाले