कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जाधव यांनी पुन्हा एकदा गैरवर्तन केल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. त्यामुळे जाधव यांनी पोलिसांना मारहाण केल्याच्या जुन्या प्रकरणातील जामीन रद्द करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली जात आहे.
एका जुन्या प्रकरणातील जामीन अर्ज रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात हर्षवर्धन जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना जामीन मिळाला होता. पुन्हा गैरवर्तन न करण्याच्या अटीवर जाधवांना जामीन मंजूर झाला होता.
मात्र जाधव यांच्याकडून पुन्हा गैरवर्तन झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. तसेच वकिलांमार्फत उच्च न्यायालयात अर्ज देखील दाखल करण्यात आलेला आहे. यावेळी मंजूर झालेला जामीन रद्द का करु नये, यासाठी हर्षवर्धन जाधव यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.