अजून 25 असते तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असते, आमदार अतुल भातखळकर यांचा सेनेला टोला
शिवसेना नेते आणि भाजपा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन थेट पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाचा खरपूस समाचार घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पाश्वभूमीवर रात्रीची संचारबंदी लागू केली होती. या निर्णयामुळे विरोधकांनी जोरदार टीका मुख्यमंत्र्यांवर केली होती. या टीकेचा राऊत यांनी खरपूस समाचार घेत भाजपाला टोला लगावला होता.
आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी खासदार संजय राऊतांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. ‘शिवसेनेकडे सध्या ५६ आमदार असल्यामुळे उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, २५ अजून असते तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असते…’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1341361376220966913?s=19
दरम्यान, ‘नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या जाण्याने शिवसेनेचे नुकसान झाले का, असा प्रश्न पत्रकार प्रतिनिधींनी राऊतांना केला असता “त्यांच्या येण्याने शिवसेनेला कोणताही फायदा झाला नव्हता असे त्यांनी बोलून दाखविले होते.