भाजपमध्ये गेल्याने विखेंना येते शांत झोप, मुश्रीफ यांनी लगावला टोला

भारतीय जनता पक्षमध्ये प्रवेश केल्यापासून मला शांत झोप येते तसेच ED आणि CBI ची भीती सुद्धा वाटत नसल्याचे विधान भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले होते याच विधावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल भाजपवर केला होतं आता याच विधानाचा संदर्भात घेत मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट भाजपा नेते आणि आमदार विखे पाटील यांना टोला लगावला आहे.

आमच्याकडे शीट आहे आणि त्यांच्याकडे (विखे) बॅलन्स आहे व भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना आता शांतपणे झोप लागत असावी, असा टोला लगावला. दरम्यान, शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या संदर्भामध्ये भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी, पाचपुते हे ज्येष्ठ आहेत व ते आमचे नेते होते. आता त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला.

महाविकास आघाडी सरकार पडत नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा भाजपचा डाव चालू आहे, पण तो कधीच यशस्वी होणार नाही. माझ्यावर जे सोमय्या यांनी आरोप केले, ते अत्यंत चुकीचे असून दूध का दूध-पानी का पानी होणार आहे. मी आयुष्यात कधीच लबाडी केली नाही, असे स्पष्ट केले होते.

Team Global News Marathi: