एकरकमी एफ.आर.पी द्या अन्यथा चारचौघात बेइज्जत करू – राजू शेट्टी
सांगली: सांगली जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी एफआरपी दिलेली नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिल्या टप्प्यात आशा कारखानदारांचे पुतळे जाळण्यास करण्यास सुरुवात केली आहे. जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर साखर सम्राटांना चारचौघात बेइज्जत करून यांना सुखाची झोप लागून देणार नाही असा गर्भित इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
आज सांगलीच्या स्टेशन चौकात केंद्राच्या कृषी विषयक कायद्याविरोधात सर्वपक्षीय किसान सभेचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्राचे काळे कायदे रद्द करण्यासाठी तीव्र लढा उभारणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले ऊसदर नियंत्रण 1966 च्या कायद्यानुसार ऊस तोडणीनंतर 14 दिवसात एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र पदविधरांची मते पदरात पाडून घेण्यासाठी साखर सम्राटांनी बैठकी एफआरपी देण्याची घोषणा केली मात्र केवळ उचल देऊन त्यांनी विश्वासघात केला आहे.
त्यामुळे स्वाभिमानीने पुतळे जाळण्याची घोषणा केली आहे .उद्यापासून त्याचे राज्यभर पडसाद उमटणार असून पुढील काळात कारखानदारांनी काटेमारी बाहेर काढणे असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. यावेळी जेष्ठ नेते बाबुराव गुरव, के डी शिंदे, बजरंग पाटील, महेश खराडे, शंभूराज काटकर, यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.