गैर काश्मिरींना मतदानाचा अधिकार मिळाल्याने दहशतवादी भडकले, थेट दिली धमकी

 

केंद्राने जम्मू-काश्मीरमध्ये इतर राज्यातील मतदारांनाही मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या घोषणेनंतर लष्कर-ए-तोयबा समर्थित दहशतवादी ग्रुप काश्मीर फाइटने गैर काश्मिरी नागरिकांवर हल्ले वाढवणार असल्याची धमकी दिली आहे. त्यांनी दहशतवाद्यांच्या एका वेबसाईटवर ही माहिती दिली आहे या पोस्टमध्ये थेट धमकी देण्यात आली आहे.

जेव्हा जिंकण्याचे मोठे कारण असते, तेव्हा मोठ्या संख्येने अनेकांचे प्राणही जातात. आमच्यापैकी कुणालाही हे आवडलेले नाही. मात्र हे सत्य आहे. सगळ्या गैर काश्मिरींना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की दिल्लीकडून हा घाणेरडा खेळ खेळला जातो आहे. अशा स्थितीत हल्लांची तीव्रता अधिक वाढवणे गरजेचे झाले आहे. आपल्या लक्ष्याप्रती प्राथमिकता देण्याची ही वेळ आहे. या पोस्टमध्ये कुणाला टार्गेट करणार याचीही माहिती देण्यात आली आहे.

यात लिहिण्यात आले आहे की, प्रत्येक परप्रांतीयाला हे हल्ले सहन करावे लागतील. त्यात सरकारी कर्मचारी, बिझनेसमॅन, मजूर, भिकारी, पर्यटक, जम्मू काश्मीर पोलीस, निमलष्करी दल, स्थानिक माहिती देणारे गद्दार या सगळ्यांना लक्ष्य करण्यात येईल, असे या साईटवर लिहिण्यात आले आहे. इतकेच नाही तर या परप्रातियांची घरे आणि तळे उद्ध्वस्त करण्यात येतील, जाळण्यात येतील असाही इशारा देण्यात आला आहे. आश्रितांच्या छावण्यांनाही टार्गेट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जम्मू आणि बाहेरच्या परिसरातही हे हल्ले करण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: