“गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ” राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

 

भाजपा आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेवर सडकून टीका केलीये. हनुमान चालीसा म्हणायला निघालेल्यांवर देशद्रोहाचं कलम लावायचं आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ आहे. त्यामुळे ते कृती करू शकत नाहीत, अशी टीका विखेंनी शिवसेनेवर केली आहे.

एका बाजुला हिंदुत्वाची नौटकी करायची आणि दुसरीकडे हिंदुत्व गुंडाळून ठेवायचे असं चित्र शिवसेनेचं पाहायला मिळत आहे. सत्तेत असतांनाही ते औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं बदलू शकले नाहीत, तसेच मुळातच शिवसेना गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यांना त्यांचे हिंदुत्व समजेनासे झाले आहे, धर्मनिरपेक्षता काय आहे हे देखील त्यांना माहिती नाही, असंही विखेपाटील म्हणालेत.

राज्यातील जनतेला कृती हवी आहे, ज्या तत्वासाठी शिवसेना सत्तेवर आली त्या मूळ हिंदूत्वाच्या तत्वालाच त्यांनी गुंडाळून ठेवले आहे, तसेच प्रत्येकवेळी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा घेतला जाणारा आधार आता फार काळ चालणार नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Team Global News Marathi: