29 ऑगस्ट पासून राज्यात इथे धो धो कोसळणार पाऊस- पंजाबराव डख पाटलांचा अंदाज
ग्लोबल न्यूज: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार. तर आजपासून या जिल्ह्यात होणार पावसाला सुरुवात. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज. पाहूया याविषयी सविस्तर बातमी.
28 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहील, तसेच 29 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे आपल्या राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
तरी या पावसाचा जवळ जवळ दहा दिवस मुक्काम आहे. तसेच 29 तारखेपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाला पोषक वातावरणात एक आणि दोन सप्टेंबर रोजी मुंबईत अतिवृष्टी होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
तर आज दिनांक 28 पासून सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचे आगमन होईल तसेच 29 तारखेपासून ते 10 सप्टेंबर या दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला