कंगना राणावतवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाष्य म्हणाले की.
ग्लोबल : अभिनेता सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणी सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न कंगनाने केला होता. या संपूर्ण वादावर महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची रोखठोक घेतलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारला होता.
मुंबईची बदनामी त्या अभिनेत्रीकडून झाली…” असे राऊत म्हणाले. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले,”ते सोडून द्या, त्यावर मला काही बोलायचं नाही, त्यावर बोलायला मला वेळही नाही. हा मुंबईकरांचा अपमान आहे आणि अशा तिने वर्णन केलेल्या मुंबईवर तुम्ही भगवा फडकवणार आहात? तोही म्हणे शुद्ध. सोडून द्या अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, वाजपेयी हे पत्रकार होते. सध्या कुठे असतात ते? त्यांच्यासुद्धा स्वातंत्र्यावर हल्ला करून त्यांना बाहेर काढले असे मला वाटतेअशी खूप मोठी यादी मध्यंतरी आली होती, त्याचा आधी अंदाज घेऊ आपण. त्याच्यामागे यंत्रणा लावा आणि ती लोपं कुठे गेली… कहां गये वो लोग? त्या सगळ्यामागे सीबीआय लावा.. या पत्रकारांवर का हल्ले झाले.. त्यांच्या नोकऱया कोणी घालवल्या? त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर.. आणि ते हल्ले कुणी केले? आणि त्यांचे तुम्ही काय काय केलेत? कसे केलेत? लावा त्यांच्यामागे सीबीआय,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी ईडी, सीबीआयच्या राजकारणावरून टीका केली.