शरद पवारांपाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी अतिवृष्टीग्रस्तांच्या पाहणीसाठी उस्मानाबाद दौऱ्यावर
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री अतिवृष्टी भागातील गावांना भेटी देणार असून प्रत्यक्ष शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे.
बुधवारी सकाळी ९:०० वाजता मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे निघणार आहेत. काटगाव येथील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहे. काटगावकडून मुख्यमंत्री ठाकरे तुळजापूर मार्गे अपसिंगा गावाला भेट देणार आहे. अपसिंगा गावातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची आणि घराची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत.
पुढे मुख्यमंत्री अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करणार आहे. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार मद्यमांशी मुख्यमंत्री ठाकरे संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी ते पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.