चिंताजनक: कोरोनाबाधित रुग्ण संख्येत चढ-उतार !

मुंबई : राज्यात दिवसभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यानं पुन्हा एकदा चिंतेच वातावरण झालं आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, चोवीस तासात राज्यात ९००० नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १८० रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासात ९००० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५,७५६ कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यात सध्या १,०३,४८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दिवसभरात १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९६.२४ इतका झाला आहे. राज्यात आजवर ४,५४,८१,२५२ नमुन्यांची तपासणी झाली असून यांपैकी ६२,१४,१९० जण पॉझिटिव्ह आले आहेत
– July 18, 2021

ग्लोबल न्युज नेटवर्क: