पुरग्रस्तांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मूख्यमंत्र्यांसोबत खासदार धेर्यशील माने यांची बैठक सुरु

 

कोल्हापुर व सांगली या दोन्ही जिल्ह्यांला काह दिवसांपूर्वी जोडणे महापुराचा तडाखा बसून मोठी हानी झाली होती.पूरग्रस्त शेतकरी बांधव,नागरिक,व्यावसायिक व मजूर यांच्या साठी मुख्यमंत्र्यांनी खासबाब म्हणुन मागण्यांना मंजुरी द्यावी यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता आता त्यांच्या या मागणीला यश आले आहे. त्याबाबतची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली.या बैठकीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हान,महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,उद्योग मंत्री सुभाष देसाई,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,प्रधान सचिव सिताराम कुंटे,विकास खारगे,मदत व पुनर्वसन प्रधान सचिव हासिन गुप्ता हे उपस्थित होते.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात येणाऱ्या कोल्हापुर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा,वारणा,पंचगंगा व इतर छोट्या मोठ्या नद्यांच्या महापुराने २००५ पासुन सातत्याने नदिकाठावरिल गावांचे नुकसान होत आहे.यामध्ये शेतीसह पशुधन,प्रापंचीक साहित्ये यांचे अतोनात नुकसान झाले आहे.कोरोना महामरीमुळे मुळातच आर्थिक संकटात आलेल्या नागरिकांचे पुन्हा महापुराने जणु कंबरडेच मोडले आहे.तेंव्हा यांचे जिवन सुसह्य करण्यासाठी माने यांनी २० आँगस्ट पासुन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु केला होता.

यामध्ये पूरहाणी झालेल्या पिकांना २०१९ पेक्षा जादा नुकसान भरपाई मिळावी.पूरबाधित जमिनींच्या मशागती साठि बिनव्याजी तीन वर्षे मुदतीचे कर्ज देणेत यावे तसेच या जमिनींमध्ये नदीच्या पात्रातील गाळ टाकून त्या सुपीक व कसदार कराव्यात. भविष्यातील पूरहाणी टाळण्यासाठी नदीच्या मुखापासून संगमांपर्यत नदीच्या पात्राची खोली करण मनेरेगा योजनेतून करावी.धरणात पाणीसाठा जुलै नंतर करावा.भूसखलण क्षेत्रात माती ओढून ठेवणार्‍या झाडांची लागवड करावी.भूसखलण व पूरग्रस्त गावामधील लोकांना गावठाण अगर गायराण जागेत पावसाळयात रहाण्यास कायमस्वरूपी जागा द्यावी.सदर लोकांना मुळ घर व वास्तव्य सोडण्याची अट काढून टाकण्यात यावी.उधोजक व व्यापारी यांच्यासाठी बिन व्याजी कर्ज द्यावे.मजूर व कष्टकरी यांच्या साठी एक वर्षासाठी मोफत धान्य द्यावे.ज्या पूरग्रस्त लोकांच्या घरी दोन दिवस पाणी साठले आहे त्याना एक वषॅ धान्य मोफत उपलब्ध करून द्यावे.

चालुचे कर्ज व्याज मुक्त करुन रिसट्रकचर करा.पूरग्रस्त वसाहतीत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनेरेगा योजनेतून निधी द्यावा.जी कामे लवकर व मजुरा शिवाय होणार आहे तेथे मजुरांची अट शिथिल करावी.एकत्रित कुटुंब प्रमुखांच्या नावे क्षेत्र असल्यास नुकसान भरपाई ही त्या क्षेत्रातील सह हिसेदाराने त्याच्या हिस्याप्रमणे तलाठी यांच्या शिफारशी ने वाटप करावी.अशा मागण्या केल्या.

Team Global News Marathi: