ग्लोबल न्यूज – देशात 16 ऑगस्टपर्यंत एकूण 3 कोटी 41 हजार 400 नमुन्यांची चाचणी झाली आहे. रविवारी एका दिवसात 7 लाख 31 हजार 697 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. देशभरात मागील 24 तासांत 57 हजार 982 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 26 लाख 47 हजार 664 झाली आहे. यांपैकी 50 हजार 921 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर 19 लाख 19 हजार 843 रुग्ण बरे झाले आहेत. 6 लाख 76 हजार 900 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना संक्रमितांच्या संख्येत भारत हा अमेरिका आणि ब्राझील नंतर जगातील तिसरा सर्वाधिक बाधित देश आहे.
देशात 16 ऑगस्टपर्यंत एकूण 3 कोटी 41 हजार 400 नमुन्यांची चाचणी पूर्ण झाली आहे. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.
वाढत्या कोविड चाचण्यांमुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मात्र, देशातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून ती सध्या 72.51 टक्के एवढी झाली आहे. मृत्यू दर अत्यंत कमी म्हणजे 1.92 टक्के एवढा झाला आहे. देशात सध्या 25.57 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.