फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलयं, सरकार पडण्याच्या दाव्यावर भाई जगताप यांची टीका

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आघाडी सरकार लवकरच पडण्याचा दावा केला होता. त्यांचा या दाव्याचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी खरपूस समाचार घेतला आहे. माझी मुंबई, माझी काँग्रेस’ हे ब्रीद वाक्य घेऊन १०० दिवसात १०० वार्ड असा संकल्प करून भाई जगताप यांनी या पदयात्रेला सुरवात केलीय. याच पदयात्रेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं म्हणत भाई जगताप यांनी हल्ला चढवला. तसेच याआधीच्या ७ दिवसात, १ महिन्यात आणि १ वर्षात सरकार पाडण्याच्या दाव्यांचं काय झालं हे सर्वांना पाहिलं असल्याचं म्हणत टोला लगावला. ते आज सायन -कोळीवाडा येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेत बोलत होते..

भाई जगताप म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. फडणवीस सुरुवातीपासून सरकार पाडण्याबाबत वक्तव्यं करत आहेत. हे सरकार स्थापन झाल्यावर फडणवीसांनी आधी ७ दिवसात सरकार पडणार असल्याचं म्हटलं. नंतर त्यांनी १ महिना आणि १ वर्षात सरकार पडणार असे भाकीत केले. या भाकितांचं काय झाले हे सर्वांनी पाहिलंय.” असा टोला सुद्धा लगावला होता.

Team Global News Marathi: