नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना बाबत महत्त्वाचे विधान करताना आपण कोरोना संपल्यासारखं वागत आहोत. मात्र परिस्थिती तशी नाही. कारण यावेळी मोदींनी देशातील कोरोना व्हायरसची स्थिती आणि जनतेचं नेमकं वागणं कसं आहे यावर भाष्य केलं आहे.
यावेळी मोदी म्हणाले की, ‘लॉकडाऊन संपलं असलं तरीही अद्याप व्हायरस गेलेला नाही. त्यामुळे आताच निष्काळजी होणं किंवा कोविड-१९ संपलं असू कुणीही मानू नये. अलिकडच्या काळात, आपल्याला अनेक फोटो किंवा व्हिडिओ पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की, बर्याच लोकांनी आता खबरदारी घेणे थांबवले आहे. हे बरोबर नाही.’ असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
https://twitter.com/ANI/status/1318531239305908225?s=19
‘जर आपण निष्काळजी असाल, मास्क न घालता घराबाहेर जात असाल तर आपण स्वत:ला, आपल्या कुटुंबाला, आपल्या कुटुंबातील मुलांना, वृद्धांना संकटात टाकत आहात. सध्या भारतात अनेक कोरोना लसीवर काम सुरु आहेत. यातील काही लस या प्रगतीपथावर आहेत. कोरोनाची लस जेव्हा येईल तेव्हा प्रत्येक भारतीयापर्यंत ती लवकरात लवकर कशी पोहचवावी याचीही सरकार तयारी करत आहे.’ असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.